महाराष्ट्र

प्रसन्न जोशींचा ‘एबीपी माझा’ प्रवास थांबला; वाचा काय कारण आहे

एबीपी माझा म्हटल की प्रसन्न जोशी हा हसतमुख चेहरा प्रत्येकाच्याच डोळ्यापुढे येतो, सोशल मिडीयावरसुध्दा प्रसन्नची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे, तितकाच त्याला ट्रोलर्सचाही सामना करावा लागतो पण प्रसन्न त्याच्या मतांवर नेहमीच ठाम राहतो, त्याच्या या निर्णयाचे सगळेच कौतुक करतात. आज एबीपी माझा सोडत असल्याची पोस्ट प्रसन्नने सोशल मिडीयावर टाकली, पाहूयाती काय होती ती पोस्ट-

‘एबीपी माझा’ हे माझ्या व्यावसायिक आयुष्यातील पर्व आहे. हा प्रवास इथे, आज थांबतोय. गेले काही दिवस मी वाहिनीवर नसल्यानं अनेक मित्र, सहृद, ओळखणाऱ्यांनी आवर्जून चौकशी केली. माझ्या तब्ब्येतीबद्दलही ख्यालीखुशाली विचारली. त्यांना तेव्हा सांगता आलं नाही ते आज कळवतो आहे. खरं तर २०१५ला पहिल्यांदा ‘माझा’ सोडल्यावर मी पुन्हा २०१७ला जॉईन झालो. ‘माझा’ आणि माझा कनेक्ट असा की मधल्या दोन-अडीच वर्षांचं अंतर जाणवलंच नाही. आज २०१७पासून ते आजपर्यंतचा काळ झरझर डोळ्यासमोरून जातोय. ‘माझा’तील पहिली इनिंग माझ्या व्यावसायिक कारकीर्दीचा पाया रचली जाण्याची होती. तर, दुसऱ्या टर्ममध्ये आतापर्यंतचा अनुभव, कौशल्य यांचा कस जोखणारी ठरली. या प्रवासात ‘माझा’मधील सगळ्या सहकाऱ्यांची खंबीर साथ मोलाची आहे आणि अर्थातच आमचे संपादक राजीव खांडेकरांचा पाठिंबासुद्धा!

या तीन-साडेतीन वर्षांत टोकाचे वाद अनुभवले, तसंच नॅशनल हेडलाईन ठरल्या अशा दोन मुलाखतीही घेता आल्या. बारामतीला शरद पवारांच्या मुलाखतीत त्यांनी सुप्रिया हरली तर लोकांचा ईव्हीएमवरचा विश्वास उडेल, या आशयाची मांडणी केली होती. ती मुलाखत आणि त्याआधी त्यांच्यासोबत झालेला सांगोल्याचा दौरा लक्षात राहील. २०१९च्या निवडणुकांसाठी ‘खडाखडी’ या कार्यक्रमासाठी केलेला राज्याचा दौऱ्यानं महाराष्ट्र पाहता आला. कोल्हापूर-सांगली पुराचं रिपोर्टींग आठवलं की आजही सांगलीतल्या मुख्य बाजारपेठेतून आयर्विन ब्रीजपर्यंतचा पाण्यानं भरलेला रस्ता आठवतो. मी त्यावेळी माझ्या लाईव्हमध्ये एक वाक्य म्हटलं होतं की, अवघ्या पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईपर्यंतच्या प्रदेशाला दूध देणाऱ्या या शहरात आज लोकांना दूध मिळण्याची मारामार आहे. यावर अनेक कोल्हापूर-सांगलीकरांनी साश्रू नयनांनी आपली वेदना मांडल्याचं मला सांगितलं. गेल्या वर्षी श्रीराम मंदिर भूमीपूजन सोहळ्यासाठी केलेला अयोध्या दौरा हाही असाच अनुभव. भारतीय राजकीय इतिहासाचं एक प्रकरण पूर्ण होताना पाहत होतो. आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही गाजत असलेल्या वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाल्यावर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘लोकमत’च्या कार्यक्रमात मुलाखत होती. ‘एबीपी माझा’ टी.व्ही. पार्टनर होता आणि मला ही मुलाखत घेण्याची जबाबदारी मिळाली. “सिंग यांची बदली हा प्रशासकीय रूटीनचा भाग म्हणायचा का?” या प्रश्नाला देशमुखांनी थेट उत्तर दिलं आणि पुढे काय झालं, काय होतंय त्याचे तुम्ही सारे साक्षीदार आहात.

गेल्या वर्षींपासून आपल्या सर्वांवर कोसळलेल्या कोरोनाच्या आपत्तीत आजतागायत गांजणारा समाज पाहतोय. कोरोना परिषद, शिक्षण परिषदेसारख्या

‘माझा’ सोडताना एक छानसा योग जुळून आला तो म्हणजे मीडियातील प्रसिद्ध अशा ‘ईएनबीए’ पुरस्कारामध्ये मला पश्चिम विभागातील बेस्ट अँकर पुरस्कार जाहीर झाला. जनरली शिव्याच खाव्या लागणाऱ्या आमच्या पेशात असं थोडंफार कौतुक बरं वाटतं.

कार्यक्रमांद्वारे या काळात ‘माझा’नं प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं ‘पॉझिटिव्ह’ काही देण्याचा प्रयत्न केला जो आजतागायत सुरू आहे.

माझा ‘माझा’तील प्रवास थांबत असला, तरी माध्यमातील प्रवास सुरूच आहे. नव्या जबाबदारी आणि नव्या मंचासह पुन्हा भेटूच…..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे