“मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे.”
आवाहन राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता पुन्हा काही प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध आणखी शिथिल न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मुंबईत मात्र लोकल बंद असल्याने लाखो मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेकांना लोकल प्रवास करता येत नसल्याने नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तर इतर मार्गांनी प्रवासाचा खर्च वाढला आहे, तसेच वेळही जास्त लागत आहे. यामुळे सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. सामान्यांचा संतापही आता वाढू लागला आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1418109185472962563?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1418109185472962563%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.maxmaharashtra.com%2Fnews-update%2Fstart-local-for-people-who-have-taken-2-doses-of-vaccine-in-mumbai-raj-thackrey-958875
या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. कोरोनावरील लसीचे दोन ड़ोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा