आपल खान्देश

मध्य उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा!

मागील काही दिवसांपासून राज्याला हुडहुडी भरली असून, तापमानाचा पाराही चांगलाच घसरला आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसणार आहे. त्यात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे.हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या उत्तर भारतातील भागात हिमवृष्टी होत असल्याने देशातील विविध भागांमध्ये तापमानात घट झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे आज आणि उद्या (३०, ३१ जानेवारी) नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारसह ११ जिल्ह्यांत थंडीची लाट येणार आहे. आज (३० जानेवारी) राज्यातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.

उद्या (३१ जानेवारी) मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत थंडीची तीव्रता कायम राहणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाट असणार आहे.

मध्य आणि पश्चिम भारतालाही अलर्ट

हवामान विभागाकडून मध्य आणि पश्चिम भारतासाठीही अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील या भागांमध्ये तापमानात घट होण्याबरोबरच २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊसही पडू शकतो, असाही अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे