सोशल माध्यमावर ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’ च्या मोहात अडकून महाराष्ट्रतील अनेक नेटकऱ्यांनी आपलं नुकसान करुन घेतलं.” सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांच सायबर गुन्ह्यांच विश्लेषण..
अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, अनोळखी व्यक्तिला आपली व्यक्तीगत माहिती देऊ नका बाहेरच्या जगात वावरताना कुटुंबातील मोठ्यांचा हा सल्ला आता सायबर जगात वावरतानाही, तेवढाच फायद्याचा आहे. हाच कानमंत्र आपल्या सोशल मिडीया आणि सायबर युगात सुरक्षित ठेऊ शकतो. कारण फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राफवर अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री, चाटिंग आणि व्यक्तिगत माहिती शेअर करण्यात मोठा धोका आहे. सोशल माध्यमावर ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’ च्या मोहात अडकून महाराष्ट्रतील अनेक नेटकऱ्यांनी आपलं नुकसान करुन घेतलं.” सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी सायबर गुन्ह्यांच्या केलेल्या विश्लेषणात ही बाब पुढे आल्याचं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. फसवणूक, एक्सॅाटर्शन, ब्लॅकमेलिंग, सायबर बुलिंग यासारखे अनेक सायबर गुन्हे महाराष्ट्रत घडले. यातल्या काही तक्रारी पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचल्या. त्यामुळे सोशल मिडीया किंवा सायबर युगात वावरताना ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’ धोका वेळीच ओळखणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष समाजात एकटेपणा वाटणारे लोक सोशल मिडियावर डिजीटल चॅट रुम्सकडे वळतात. या चॅटरुम्समघून काही वेळा मनोरंजन किंवा मानसिक आधार मिळू शकतो. पण, देशातील सायबर गुन्हेगारीचं विश्लेषण केल्यास यातून बऱ्याचदा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे सायबर युगात वावरताना ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका ओळखणं गरजेचं आहे.
“देशात 2020 या वर्षात 50 हजारच्या वर सायबर गुन्हे घडले. यापेक्षाही पोलीस स्टेशनमध्ये नोंद न झालेले सायबर गुन्हे कितीतरीपट जास्त आहे. यातील बहुतांश सायबर गुन्हे ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका न ओळखल्यामुळे घडलेय. म्हणजेच सामाजिक माध्यमात वावरताना उठ सूठ कुणाशीही फ्रेंडशिप करणे, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे आणि आपली वैयक्तिक माहिती शेअर करण्यातून घडलेय. प्रत्यक्ष समाजात एकटेपणा वाटणारे लोक ‘डिजिटल फ्रेंडशिप’चा पर्याय निवडतात. इंटरनेट, सोशल मिडीयावर असंख्य ‘चॅट रुम्स’ आहेत, यातल्या काही फ्री तर काही पेड आहेत. काही ‘चॅट रुम्स’ ओळख जाहिर करत नसल्याचा दावा करतात आणि इथेच काहींचा तोल सुटतो आणि सुरु होते लैंगिक विषयावर खुला संवाद. हा संवाद आणि नको त्या प्रदर्शनाच्या रेकॅार्डच्या आधारे युजर्सला फसवले जाते. त्यामुळे धोका ओळखून पावलं उचलावी. आभासी जगात वावरताना सावधानता बाळगावी” असं आवाहन सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी नेटकऱ्यांना केलं आहे.
नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका जेष्ठ नागरीकाची अशीच फसवणूक झाली. एकटेपणा घालवण्यासाठी ते विदेशात राहणाऱ्या तरुणीशी चॅट करत करायचे. त्यांच्यासोबतंही ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका झाला. त्यांची 75 हजारांची फसवणूक झाली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण आहे. देशभरात गेल्या वर्षभरात घडलेल्या 50 हजार सायबर गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडलेय. त्यामुळे सायबर गुन्ह्यामधून आपल्या परिवाराला, समाजाला आणि देशाला सुरक्षित ठेवायचं असेल. तर सावध पावलं उचलणं हिच काळाची खरी गरज आहे.







