आपल खान्देशकृषीवार्ता

शेतीसाठी कृषी पंपांना होणारा वीज पुरवठा सुरळीत करून अखंडित ८ तास वीजपुरवठा मिळावा भाजपाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पाचोरा (प्रतिनिधी) महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना होणारा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून अनियमित पद्धतीने व कमी दाबाने होत असून तो सुरळीत करून अखंडित पद्धतीने ८ तास देण्यात यावा. याकरिता खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कृषिपंपांना किमान ८ तास वीज देण्याचे धोरण असताना कुठे चार तास तर कुठे दोन तास वीजपुरवठा देण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून शेतकऱ्यांनी या संदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महावितरण यावर कुठलाही दखल घेऊन उपाययोजना करताना दिसत नाही.त्यामुळे कृषी पंपांना वीजपुरवठा सुरळीत नझाल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी बोलताना दिला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे