आपल खान्देशकृषीवार्ता
पाचोरा तालुक्यात पाऊसा विना शेतकऱ्यांवर घोंगावतेय दुबार पेरणीचे संकट
Pachora Live24 @ Gramin Reporter
श्री संजय तुकाराम परदेशी (आखतवाडे)
नगरदेवळा: पाचोरा आणि भडगाव परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात वारा वादळ अवकाळी पाऊस संकटाला तोंड देत शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरवशावर काळ्या आईच्या कुशीत जवळची होती नव्हती पुंजी लावून शेती हिरवीगार केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतातील बिजांकुर जन्म घेताच जागेवरच कोंमजली असल्याचे चित्र सध्या शेती शिवारात पहावयास मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
आखतवाड्यात पाण्याविना पिकांनी तग न धरल्याने पिकांवर वखर मारावे लागले
आखतवाडे परिसरात दि.२७/२८ जुन पासून म्हणजे १२ ते १५ दिवसांनपासुन वरुन राजाने पाठ फिरविली असुन त्यातच गेल्या १५दिवसांपासून मे महिन्यात न पडलेला ३८ ते ४० डीग्रीचा तापमान असल्याने मका पिकाचे मोठे नुकसान होत आहे. तर मका व कपाशीच्या पिकाची सुध्दा वाढ खुंटली आहे.
गेले अनेक वर्षापासून अवेळी व अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांला नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल या आशेने वरुणराजाने हजेरी लावल्याने बी-बियाणे व खताची जुळवाजुळव करून आपल्या शेतातील पेरण्या पूर्ण केल्या. त्या शेतातील कपाशी, उडीद, मूग, बाजरी आणि ज्वारीसह आदी पिके बऱ्यापैकी अंकुरले असतांनाच गेले काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने जमिनीवर आलेल्या पिकांनी पावसाअभावी मानाखाली टाकायला सुरुवात केली असल्याने शेतातून बिजांकुर जन्मतात जागेवरच कोमजत असल्याचे चित्र सध्या शेती शिवारात पहावयास मिळत आहे.
पाचोरा भडगाव तालुका परिसरात गेले अनेक वर्षापासून गारपीट तर कधी अवकाळी पाऊस तसेच नापिकीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामधून शेतकरी अद्यापही सावरणार नाही कसेबसे कर्ज काढुन व उसनवारी करुन बी बियाणे खरेदी केली त्यानंतर जून महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या; मात्र पेरणी केल्यानंतर अनेक पिके जमिनीवर आली असताना पावसाने दगा दिल्याने पावसाअभावी त्यां पिकांनी माना खाली टाकल्या आहेत.
बहुतांश शेतातील पिके वाढत्या तापमानामुळे जाग्यावरच कोमजत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावताना दिसत आहे. पाऊस लांबल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी शेतीच्या बांधावर मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.







