आपल खान्देश

संविधान आर्मी संघटनेतर्फे सुरू केलेले आमरण उपोषणास लेखी आश्वासनानंतर स्थगित

संविधान आर्मी संघटनेतर्फे सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण सरपंच ग्रामसेवक यांच्या लेखी आश्वासनानंतर तूर्त स्थगित.

नांदगाव( प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- मौजे रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील शासनाने दिलेल्या सार्वजनिक सुविधेसाठी मधील भूखंड क्रमांक तीन हा 29 नोव्हेंबर 2021 रोजी बौद्ध समाजाच्या बुद्ध विहारासाठी देण्यात यावा असा ठराव झालेला असताना देखिल येथील ग्रामपंचायतीचे ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब तुकाराम अरबुज व त्यांचे बंधू सुनील तुकाराम अरबुज यांनी नियोजित बुद्ध विहार च्या भूखंड क्रमांक तीन च्या समोर अतिक्रमण करून दुकान टाकली असल्याने डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारात पावसाळ्यात पाणी कोणते व पाणी वाहून जात नसल्याने रोगराई तसं ते लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरत असल्याने तसेच सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम करण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे सन 2016 मध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक तहसीलदार नांदगाव गट विकास अधिकारी नांदगाव ग्रामपंचायत यांना सदर अतिक्रमण काढणे बाबत नांदगाव तहसील कार्यालयासमोर रोहिले बुद्रुक येथील बौद्ध ग्रामस्थ उपोषणास बसले होते परंतु गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांनी अतिक्रमण काढणे बाबत आश्वासन दिले होते उद्यापर्यंत अतिक्रमण काढण्यात आले नाही तसेच येथील ग्रामपंचायतीला सविधान आर्मी तर्फे सहा महिन्यापासून सदर अतिक्रमण काढणे संदर्भात अर्ज दिलेला असताना देखील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत व मासिक सभेत ठराव मंजूर झालेले असताना देखील ग्रामसेवक भगवान जाधव यांनी कधीही कारवाई न केल्याने आज 27 डिसेंबर2021 रोजी सोमवारी सविधान आर्मी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष मुक्ताराम बागुल व रोहिले बुद्रुक शाखेचे अध्यक्ष रवींद्र यादव बागुल यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र सरपंच ठकुबाई देविदास पवार, ग्रामसेवक भगवान जाधव, नांदगाव पंचायत समितीचे विस्ताराधिकारी मांडवडे साहेब यांच्या हस्ते लेखी अतिक्रमण काढणे येईल असे आश्वासन दिल्यानंतर मिळाल्यानंतर पाणी पिऊन उपोषण तूर्त स्थगिती करण्यात आले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगुर्डे, बागुल व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे