देश-विदेशमहाराष्ट्र

अग्निपथ योजनेची संरक्षणमंत्र्याकडून घोषणा; पहा काय नेमकी योजना?

‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

झूम मराठी न्यूज नेटवर्क  

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी ‘अग्निपथ’ नामक योजनेची आज घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्य दलात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. तसेच तरुणांना रोजगारही दिला जाणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी तिन्ही सैन्य दलांचे प्रमुखही उपस्थित होते. केंद्र सरकारच्या संरक्षण विषयक कॅबिनेट कमिटीने आज मंगळवारी (14 जून) ‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत भारतीय तरुणांना सशस्त्र सेवेत सामील होण्याची संधी दिली जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अग्निपथ’ योजनेची माहिती दिली होती. लष्करी व्यवहार विभाग त्याची अंमलबजावणी करत आहे. चार वर्षांनंतर या योजनेअंतर्गत भरती झालेल्या 80 टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उरलेल्या 20 टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.

भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गत एक निर्णय घेतला आहे. आज ‘अग्निपथ’ या परिवर्तनीय योजनेच्या माध्यमातून एका ऐतिहासिक योजनेची घोषणा आम्ही करत आहोत. ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत अग्निवीर सेनामध्ये सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ही योजना देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी व देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने सुरू करण्यात येत आहे, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे