आपल खान्देश
नगरसेवक संजयनाना वाघ व नगरसेविका रंजनाताई भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे तीन कॉलनीचा पाणी प्रश्न लागला मार्गी
पाचोरा प्रभाग क्रमांक 9 मधील मयूर पार्क, संतोष पाटील नगर, गोविंद नगरी ह्या 3 कॉलनीचा पाणी प्रश्न बर्याच दिवसापासून प्रलंबित होता त्याचा पाठपुरवठा करत मार्गी लागल्या मुळे स्थानिक नागरिकानी त्यांचे कौतुक केले.
स्थानिक नगरसेवक नानासाहेब संजय वाघ व नगरसेविका रंजनाताई भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला तसेच त्याचे उद्घाटन नगरपालिका गटनेते व नगरसेवक नानासाहेब संजय वाघ व नगरसेविका रंजनाताई भोसले यांचे हस्ते करण्यात आले होते, आणि दि 27/12/2021 पासून कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे, संपुर्ण परिसरात नागरिकांनी नानासाहेबचे खूप खूप आभार मानले,कामाचे नियोजन करून देताना प्रा,मनीष बाविस्कर, जितेंद्र देवरे,रवी देवरे,निलेश पाटील,दीपक ब्राह्मणे,हरून देशमुख ,हेमंत पाटील स्थानिक नागरिक व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.




