कर्जत तहसिल कार्यालयात पाण्याचा खडखडाट, नागरिकांसह कर्मचा-यांची होतेय गैरसोय
- प्रभाकर गंगावणे (रायगड जिल्हा प्रतिनिधी )
कर्जत: पाण्याशिवाय जीवन नाही. दैनंदिन जीवनात पाणी नसेल तर जीव सृष्टी नष्ट होईल हे त्रिकाल सत्य आहे. सद्या कोरोना महामारीचे भीषण संकट ओढावले आहे आणि त्यातच कर्जत तहसिल कार्यालयात मागील काही महिन्यांपासुन पाणी पुरवठा होत नसल्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी व कामानिमित्त येणा-या नागरिकांची गैरसोय होऊन कुचंबणा होत आहे. कर्जत तहसिल कार्यालयात पाण्याचा होणारा पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्यास पाणी मिळत नाही तसेच शौचालयात व मुतारी मध्ये देखील पाणी नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अत्यावश्यक सेवेकरिता पाणीच उपलब्ध नसल्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी व कामानिमित्त येणा-या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तहसिल कार्यालयातील पाणी पुरवठा बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे ह्यांनी नायब तहसिलदार श्री. एस. आर. बाचकर ह्यांना ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी तहसील कार्यालयाचा रस्ता बनवत असताना पाईप लाईन फुटली असुन लवकरच पाईप लाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करु असे उत्तर दिले. ह्यावर गंगावणे ह्यांनी नायब तहसिलदार श्री. बाचकर आण्णा ह्यांना कर्जत तहसिल कार्यालयात पाण्यावाचुन नागरिकांची व कर्मचा-यांची होणारी गैरसोय लवकरात लवकर दुर करावी अशी स्थानिक नागरिकांची विनंती आहे



