आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
अखेर ५९७ कंत्राटी आरोग्य सेवकांना तात्पुरती नियुक्ती
कोरोना काळात जीवाची बाजी लावून आरोग्य सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. झूम मराठी ने बातमी दिली होती प्रशासनाने जळगाव जिल्ह्यातील मधील 19 आणि राज्यभरातील ५९७ आरोग्य सेविकांना पुनर्नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन महिन्यांकरीता या आरोग्य सेविकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. यानंतर या सर्व आरोग्य सेविका कामावर हजर झाल्या आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील 19 आरोग्य सेविकांना कार्यमुक्त करण्यात आले होते. राज्य सरकारने 27 ऑगस्ट 2021 रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. यानंतर विविध मीडिया ने मिळून कंत्राटी कामगारांची व्यथा मांडणारा रिपोर्ट सादर केला होता. 14 सप्टेंबर रोजी 29 कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे.
१०-१५ वर्ष काम करुनही आम्हाला कामावरुन कमी केले गेले, आम्ही केलेल्या सेवेचा विचार केला नाही, आम्ही घर कसे चालवायचे असा सवाल या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विचारला होता.


