आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

धुळे जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊन लागू, वाचा काय सुरू काय बंद?

 

नव्या निर्बंधनुसार सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत उघडी राहतील. जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकान शनिवार-रविवार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. वाइन शॉप, परमिट रूम सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते 4 पर्यंत खुली ठेवता येणार आहे. शनिवार- रविवार याच वेळेवर फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

धुळे (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर टाळेबंदी पूर्णतः शिथिल करण्यात आली होती. मात्र, लग्न समारंभ, बाजारपेठेत वाढत्या गर्दीमधून भविष्यातील धोके टाळण्यासाठी टाळेबंदीची नवीन निर्बंध जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्यात दिनांक 28 जून पासून नव्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  संजय यादव यांनी दिले आहे.

नव्या निर्बंधनुसार सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत उघडी राहतील. जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकान शनिवार-रविवार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. वाइन शॉप, परमिट रूम सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते 4 पर्यंत खुली ठेवता येणार आहे. शनिवार- रविवार याच वेळेवर फक्त होम डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय व शिवभजन सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते चार वाजेपर्यंत सुरू असणार असून आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवता येणार आहे. तसेच शनिवार-रविवार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सेवा देता येणार आहे

सर्व शासकीय कार्यालय 50% क्षमतेनुसार सुरू ठेवता येणार आहे. उद्योग आणि कारखाने यांना पूर्ण वेळ काम करण्याची अनुमती देण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक स्थळ, क्रिडांगण, बगीचे सकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत ठेवता येणार आहे. तसेच सर्व टॉकीज, सभागृह, नाट्यगृह व मल्टिप्लेक्स पूर्णता बंद राहणार आहे.

लग्न समारंभाकरिता 50 लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत विवाह करता येणार आहे. अंतिम यात्रेकरता वीस लोक उपस्थित राहू शकतील. कृषी संबंधित सर्व काम दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार. सर्व प्रकारच्या सभा, बैठक, सहकारी संस्था, आमसभा यांना सभागृहाच्या आसन क्षमतेच्या 50% व झूम मीटिंग घेण्याचे निर्देशीत केले आहे.

50 टक्के क्षमतेवर जिम, व्यायाम शाळा, ब्युटी पार्लर, स्पा व वेलनेस सेंटर सुरू राहणार आहेत. सार्वजनिक वाहनांना शतप्रतिशत क्षमते सह काम करण्याची सोय दिली आहे. सायंकाळी पाच वाजतापासून संचारबंदी सुरू होणार आहे. दरम्यान, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रतिबंधित लावण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे