देशात सात दिवसांचा दुखवटा असताना जळगावात अजय-अतुल यांचा संगीत कार्यक्रम होतोय ?
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हा राष्ट्रीय दुःखाच्या सावटा खाली आहे. या दुखवटामध्ये कुठलेही प्रशासकीय औपचारिक कार्यक्रम हे घेतले जात नाही. यादरम्यान, जळगाव शहरात २७ डिसेंबर रोजी खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष प्रसाद यांनी शासकीय दुखवटा असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे बचत गटाच्या महिलांनी सांगितले.
खानदेश महोत्सव हा देशात दुखवटा असल्याने रद्द करण्यात आला आहे. तर जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे वाघूर डॅम यावर ३१ डिसेंबर रोजी अजय – अतुल यांच्या भव्य दिव्य ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले, मग त्यांना या दुखवट्याचे नियम नाहीत का? हा सामान्य व्यक्तींना पडलेला प्रश्न आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खानदेश महोत्सव दुखवटा असल्याने रद्द केला, पण ३१ डिसेंबर रोजी होणारा ऑर्केस्ट्रा रद्द करण्याची आवश्यकता का भासत नाही?
गारखेडा प्रकल्प हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याअंतर्गत येतो. या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाला ६० टक्के रक्कम ही सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च केली आहे, तर वरील ४० टक्के रक्कम ही एका खाजगी ठेकेदाराकडून घेतली आहे. त्या ठेकेदाराला तीस वर्षांसाठी हा प्रकल्प देण्यात आला असल्याची माहिती आहे.
खान्देश महोत्सव दुखवटामुळे रद्द होऊ शकतो, तर हा श्रीमंतांचा कार्यक्रम जिल्हाधिकारी रद्द करण्याचा निर्णय का घेत नाही? का शासनाच्या दबावाखाली जिल्हाधिकारी बळी पडत आहे? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना आता पडू लागलेले आहे. ३१ डिसेंबर रोजी अजय – अतुल यांचा होणारा ऑर्केस्ट्रासाठी चार हजार, आठ हजार आणि बारा हजार अशा तिकिटाची विक्री करण्यात आली असल्याची सूत्रलायक माहिती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याकडून जे जिल्ह्यातील ठेकेदार आहे, त्यांना जबरदस्ती देण्यात आले असल्याची माहिती एका ठेकेदाराने नाव न देण्याच्या बोलीवर सांगितली आहे.




