कृषीवार्तामहाराष्ट्र

कांद्याला मातीमोल भाव ; ‘या’ कारणामुळे पडले भाव

शेतकऱ्याने स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावलेल्या कांद्याला मातीमोल भाव ; ‘या’ कारणामुळे पडले भाव

स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. शेतकऱ्याने सहा महिने कांद्याची साठवणूक करून कांद्याला योग्य तो भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

उन्हाळी कांदा हा मार्च-एप्रिलच्या दरम्यान साठवणूक करण्यास सुरवात होते. खरिपातील कांदा बाजारात येण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी साठवणूकीतला कांदा विक्रीसाठी काढला त्यांना चांगला मोबदला मिळाला पण आता केंद्र सरकारची धोरणे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कांद्याला उठावच नाही शिवाय निर्यातीबाबतही धरसोड होत असल्याने दर कमी झाले आहेत.

त्यामुळे क्विंटलमागे जवळपास 700 रुपयांचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. ऑक्टोंबर महिन्यात 3 हजारावर गेलेला कांदा आता अंतिम टप्प्यात 2 हजार रुपये प्रमाणे विकावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत ऑक्टोंबरच्या तुलनेत कांद्याचे दर हे 1 हजार रुपयांनी घसरलेले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे