आपल खान्देशकृषीवार्ता

धुळ्यात बेसुमार वृक्षतोड, वखारी तात्काळ बंद करण्याची मागणी

एकीकडे राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासह विविध उपयोजनांवर भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र धुळे जिल्ह्यात वृक्षांची सर्रासपणे कत्तल होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

एकीकडे राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासह विविध उपयोजनांवर भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र धुळे जिल्ह्यात वृक्षांची सर्रासपणे कत्तल होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तोडलेली झाडे थेट वखारित नेली जात असून विशेष म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या झाडांची कुठलीही नोंद नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वखारीत देण्यात आलेल्या झाडांची नोंद नाही.

दुसरीकडे धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागात झाडांची विनापरवानगी कत्तल केली जात असून तोडलेली झाडे थेट वखारीत नेली जात आहे. विशेष म्हणजे वखारीत देण्यात आलेल्या झाडांबाबत कुठलीही नोंद किंवा त्यांची पासेस नसल्याचा देखील प्रकार समोर येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. अनेक ठिकाणी झाडे तोडण्यासाठी थेट झाडांना पेटवून देत असल्याचा देखील प्रकार समोर आला आहे.  

वखारी तात्काळ बंद करण्याची मागणी

याबाबत वनविभाग, महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा ग्रामस्थांनी म्हटले आहे. कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आलेल्या झाडांची नोंद नसल्याने निश्चित आकडेवारी देखील समोर येऊ शकली नाही. यामुळे एकीकडे पावसाळ्यात वनविभागा कडून वृक्ष लागवडीचे नियोजन केले जात असले आणि त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जात असले तरी दुसरीकडे मात्र या पद्धतीने झाडांची होणारी कत्तल थांबविण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. झाडांची कत्तल थांबवून सुरू असलेल्या वखारी तात्काळ बंद करण्याची देखील मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे. 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे