कुसुंब्यातील धनगर समाजातील विधवा प्रथा बंद करणेबाबत निवेदन
झूम मराठी
कुसुंबा ( प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील धनगर समाजातील तरुणांनी समाज उत्कर्षासाठी एक पाऊल पुढे टाकत धनगर समाजातील विधवानां सन्मानाने समाजात जगता यावे यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचाया आशयाचे मागणीचे पत्र धनगर समाजाचे अध्यक्ष छबिलाल आण्णा परदेशी तसेच पंच मंडळातील पदाधिकारी महादु आबा (समाज भुषण) तसेच रामलाल तुळशीराम परदेशी ( माजी उप सरपंच कुसुंबा) यांच्या कडे देण्यात आले.
पती निधनानंतर महिलेचे मंगळसूत्र तोडण्यात येते, कुंकू पुसण्यात येते, बांगड्या फोडल्या जातात, जोडवी काढण्यात येतात, त्याचबरोबर आयुष्यभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेता येत नाही, अशी सद्य:स्थिती आहे. सती प्रथा बंद झाली मात्र विधवा झाल्यानंतरच्या प्रथेमुळे सन्मानाने जगण्याच्या महिलेच्या हक्कावर गदा येत असल्याने सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी कुसुंबा धनगर समाज अध्यक्ष आणि समाज पंच पदाधिकारी यांनी तरुणांना आश्वाशीत केले याविषयी लवकरच समाजाची मिटिंग बोलवुन यातुन सकारात्मक भुमिका घेऊ आणि त्यांनी “विधवा प्रथा” बंद करण्याच्या मागणी करणार्या तरुणांच कौतुक केले की हा विषय पुढे येण्याचे खुप गरजेचे होते.
यावेळी सुनिल परदेशी सर, धिरज परदेशी सर, भास्कर गढरी, आशिष परदेशी, पृथ्वीराज गढरी, अनिल परदेशी, भगवान गढरी, योगेश परदेशी आदि समाज बांधव उपस्थित होते.




