आपल खान्देश
बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाइन सुगरण प्रश्न मंजूशेमध्ये नागरिक व निसर्ग मित्र सहभागी
खानदेशातील महत्त्वपूर्ण कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाइन सुगरण प्रश्न मंजूशेमध्ये 712 नागरिक व निसर्ग मित्र सहभागी


पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ
झूम मराठी जळगाव (प्रतिनिधी)निसर्ग मित्र जळगाव तर्फे 11 ऑगस्ट 2011 कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत घेतलेल्या महाराष्ट्र राज्य ऑनलाईन सुगरण प्रश्नमंजुषा मध्ये सर्व वयोगटातील 712 बंधू भगिनीनी सहभाग घेतला प्रश्नमंजुषा मध्ये महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधून तर महाराष्ट्राबाहेरील सुरत व इंदूर येथून भाग घेतलेल्या 712 पैकी 56% महिला होत्या 44 ०/० पुरुष सहभागी झाल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिल्याने अनेक लोकांपर्यंत कवयत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव पोहोचले प्रश्नमंजुषा च्या कार्यक्रमाला अचूक उत्तर मिळाले प्रश्नमंजुषा घेण्यासाठी मागील कारण सांगताना गाडगीळ म्हणाले की कवयत्री बहिणाबाई चौधरी साध्या आणि सरळ खानदेशी गणबोली तून निसर्ग पशुपक्षी यांचे वर्तन भाव भावना कशा प्रकारे प्रकट केल्या जातात! ते त्यांनी आपल्या ओवीमधून लोकांना सांगितल्या आपल्या कवितेत त्यांनी पुढील प्रमाणे कविता केले आहे कपाशी न बोंड न उले त्याले बोंड म्हणू नये! अरे खोप्यामधील खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलांसाठी तिने झोका झाडाले टांगला! या ओळीतून सुगरण पक्षाचे वर्णन सुगरण पक्षाचा विणीचा हंगाम सर्वत्र बहरला आहे! हे औचित्य साधून निसर्ग मित्र जळगाव तर्फे प्रश्नमंजुषा ऑनलाइन कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला! व अनेक लोकांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन कार्याला प्रेरणा मिळाली आहे! तसेच प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे सहभागाचे प्रमाणपत्र व्हाट्स ॲप द्वारे देण्यात आले आहे! सर्व सहभागी बंधू-भगिनींनी गाडगीळ कुटुंबाचे आभार मानले



