आपल खान्देशकृषीवार्ता

धन्यवाद उद्धव ठाकरे सरकार ! रावेरचे केळी उत्पादकांनी मानले आभार

राज्य सरकारने केळीला फळाचा दर्जा देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलाय

रावेर : रावेरच्या केळी उत्पादकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. केळीला राज्य शासनाने फळाचा दर्जा दिला. त्यामुळे खुश होऊ शेतकऱ्यांनी केळीच्या घडाची मिरवणूक काढली. यावेळी त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन करीत `धन्यवाद उद्धव ठाकरे सरकार’  असा संदेश त्यांनी बॅनरच्या माध्यमातून दिला.

,रावेरमधील माजी आमदार अरुण पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून सजवलेल्या हातगाडीवर केळीचे घड, दर्शनी भागात केळीला फळाचा दर्जा मिळवून देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे अभिनंदनाचे बॅनर लावून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

केळीला फळाचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जयघोष करण्यात आला. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

राज्य सरकारने केळीला फळाचा दर्जा देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, अटवाडे येथील शेतकरी आर. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे