मुंबई | तलवार कशी गाजवायची हे मला माहिती आहे. योग्य वेळी तलवार फिरवेन, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. माझगाव येथे पालिकेने महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मधल्या काळात माझ्यावर शस्त्रक्रियेला मला सामोरे जावे लागेल. मी अजूनही तसा घराबाहेर पडलो नसलो. यांचा अर्थ असा नाही की, मी बाहेर पडायला असमर्थ आहे. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. आणि तलवार जरी हातामध्ये नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्याही नसानसामध्ये भिनले आहे. यामुळे ती जेव्हा गाजवायची, चालवायची फिरवायची योग्य वेळी मी फिरवत आलेलो आहे. या पुढे सुद्धा फिरवणार आहेच. पण विशेष म्हणजे त्यावेळी सैनिक, मावळे हे त्या त्या वीरांना लाभले. तसे तुम्ही आजच्या काळातील सैनिक हे सर्व शिवसैनिक हे शिवसैनिकांच्या पुण्यांनी माझ्या आणि आदित्यच्यासोबत आलेले आहेत. हे सुद्धा आमचे मोठे भाग्यच आहे.” या कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्ताने शिवसेनेने पालिका निवडणुकीचा नारळ फोडला आहे. येत्या काही दिवसातच राज्यातील १४ पालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा