महाराष्ट्रराजकीय

सरकार कोसळेल तेव्हा पर्याय देणार, देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार!!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी सरकारचे काय चालले आहे ते दिसते आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार पडणार का असा सवाल विचारला त्यावर फडणवीस यांनी सरकार पडले तर पर्यायी सरकार देण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. फडणवीस यांनी याआधीही असा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही, ते त्यांच्यातील मतभेदांमुळे पडणार आहे. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल त्या दिवशी आम्ही अल्टरनेट देऊ, असे फडणवीस यांनी पुन्हा सांगितले आहे.

गेल्या काही दिवसात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, राष्ट्रवादीवर केलेली टीका यामुळे शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार अस्थिर आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. पण गुरूवारीच नाना पटोले यांनी सरकार अस्थिर नसून ५ वर्ष टीकेल असा दावा केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे