काटगाव ता. तुळजापूर येथे वीज पडून एक मुलगा आणि ३० शेळ्या मृत्युमुखी
Dileep pardeshi @zoommarathinews
तुळजापूर – अवकाळी पावसादरम्यान तुळजापूर शहरासह काटगाव येथील शेतशिवारातील झाडावर वीज कोसळल्याने बाल गुराखी आणि त्याच्या 30 शेळ्या ठार झाल्या.
काटगावातील घरच्या शेळ्या चारण्यासाठी रानात गेला होता. त्यानंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. गुराखी मुलाने पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाचा आसरा घेतला. तेव्हा अचानक वीज कोसळल्याने झाडाखाली आसारा धरून बसलेल्या गुराखी मुलांसहित त्याच्या 30 शेळ्या मृत्युंमुखी झाल्या परीसरात घटने बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
कृपया नागरिकांनी विजेपासून बचावासाठी झाडाचा आसरा न घेता सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन झूम न्यूज करत आहे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा