अंबरनाथ | अमराठी कामगार भरती प्रकरणी इन्व्हेनशिया हेल्थ केअर लि. अंबरनाथ एमआयडीसी मधील कंपनीवर मनसे शिष्टमंडळाची धडक
रविवारी ३ सप्टेंबर रोजी वापी ,गुजरात येथे अंबरनाथ मधील कंपनीसाठी नोकरी भरती केली… B.Sc, M.Sc, ITI,.B.Pharm, D.Pharm मुले अंबरनाथ मध्ये, महाराष्ट्र मध्ये नाहीं का?
शासनाचे सर्व सोयी सुविधा महाराष्ट्रात लाभ घ्यायचा आणि नोकरीसाठी भरती महाराष्ट्र बाहेर गुजरातला का करायची??
शासनाचे धोरण आहे ८०% स्थानिकांना रोजगार, परंतु शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे औद्योगिक कंपनीची अशी हिम्मत होते ..
आणि अशी पहिली वेळ नाही, याआधी देखील वापी येथून इंवेशिया कंपनीने भरती केली होती…पण यापुढे स्थानिक नागरिक आणि मनसे ही बाब खपवून घेणार नाही. ही बाब समोर आल्यावर आज मनसे शिष्टमंडळ ह्यांनी कंपनीवर धडक दिली.. आज सुट्टी असल्याने संबधित कर्मचारी उपलब्ध नसल्याने, पुढील आठवड्यात ह्यावर उत्तर मागविले आहे.. आणि ही नोकरी भरती रद्द करण्याची सूचना केली आहे , अन्यथा मनसेशी गाठ आहे.
ह्यावेळी शैलेश शिर्के – उपजिल्हा अध्यक्ष, अँड स्वप्निल बागुल- मा.नगरसेवक, राकेश परदेशी- कामगार सेना कार्यकारणी सदस्य, नितीन पाटील – उपजिल्हा सचिव, योगेश पाटील -विभाग अध्यक्ष, रमेश पाटील- स्वयंरोजगार सेना अध्यक्ष, देविदास पाटील- वाहतूक सेना विधानसभा अध्यक्ष, पंकज नरे- शाखा प्रमुख, सचिन कोरडे- शाखा प्रमुख उपस्थित होते
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा