ब्रेकिंगमहाराष्ट्र

मोठी बातमी! निर्बंधांमध्ये वाढ, आज रात्री 8 वाजतापासून किराणा दुकान वेळेसह लागू होणार ‘हे’ नवे निर्बंध

झूम मराठी न्यूज वेब मीडिया 

मुंबई – वाढता करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारकडून 14 एप्रिलपासून 1 मे पर्यंत संचारबंदीसह इतरही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये अजून वाढ करण्यात आली आहे. नवीन नियमावलीनुसार, किराणा, भाजीपाला, फळे अशा सेवा आता सकाळी 7 ते 11 वाजपेर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (20 एप्रिल) रात्री 8 वाजतापासून हे नियम लागू होणार आहेत. राज्य सरकारकडून नवीन निर्बंधांबाबत आदेश काढून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

1) सर्व किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकरची अन्नपदार्थांची दुकाने, मांस-मच्छी-मटण विक्रेते, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारी दुकाने, पावसाळी साहित्य (छत्री, रेनकोट, ताडपत्री इ.) विकणारी दुकाने यांना सकाळी 7 ते 11 या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे.

3) स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापनाला कोणत्याही सेवेचा किंवा सुविधेचा समावेश अत्यावश्यक सेवा किंवा सुविधेमध्ये करायचा असल्यास त्यासाठी राज्य आपत्ती निवारण व्यवस्थापनाची परवानगी घेणं बंधनकारक असेल.

4) वर उल्लेख केलेल्या नव्या बदलांशिवाय इतर सर्व निर्बंध हे 13 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांनुसारच असतील.

दरम्यान, किराणा दुकानामुळे गर्दी वाढून संसर्ग वाढत असल्यामुळे सोमवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली होती. त्यात त्यांनी किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच खुली असावीत असा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता किराणा दुकानाबरोबरच फळे, भाजीपाला, अन्नपदार्थ विक्री, शेती उत्पादने या सेवांबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे