“शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे”, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी..
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वरील शासन निर्णयानुसार तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून 3 पट आर्थिक मदत द्यावी.
पाचोरा भडगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे. पिके सडली आहेत. काही ठिकणी पिकासह जमिनी वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसला आहे स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासदंर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
पाचोरा भडगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे कारण परिस्थिती अशी आहे की, गावागावांमध्ये, शेताशेतांमध्ये आपण जाऊन बघितलं, तर पेरलेलं पीक तर काहीच राहिले नाही. सडून गेलं. या महाराष्ट्राचे शासन, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहे आता फक्त सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
उपरोक्त विषयान्वये विनंती की, माझ्या पाचोरा भडगाव मतदार संघात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगाम पूर्णतः नष्ट झालेला आहे. शेतात शेतकऱ्यांना पीक ही काढायलाही जाता येत नाही इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. मी स्वतः मतदार संघात जाऊन परिस्थितीची पाहणी करून कृषी व महसूल प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी केलेल्या पंचनामानुसार दोन्ही तालुक्यात 100 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शेतजमिनीमधील पाण्याचा निचरा होत नसून जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे पीक सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात शेतीचे कोणतेच उत्पन्न येणार नाही असे दिसत आहे.
मागील दोन वर्षापासून दोन्ही तालुक्यांत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनातं नुकसान झाले आहे. मात्र त्यांना अद्यापही त्यांची भरपाई मिळालेली नाही. त्यात आत्ताच्या निसर्गाच्या अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यासाठी दि. 11 सप्टेंबर 2019 च्या लागू केलेल्या निकषाप्रमाणे शासनाने मदतीसाठी काढलेल्या जिआर नुसार एनडीआरएफच्या मदतीच्या निकषाप्रमाणे 3 पट मदत दिली होती. त्याचप्रमाणे तशीच मदत माझ्या मतदार संघात मिळावी. पाचोरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2025 (114.8 मी.मी) 22 सप्टेंबर 2025 (147.8 मी.मी) व 23 सप्टेंबर 2025 (139.3 मी.मी) सप्टेंबर 2025 ला पाउस झाला असून तालुक्याचा सरासरी पाऊस 136.4 मी.मी असून तो सरासरीपर्जन्यपेक्षा जास्त पेक्षा जास्त 257.8 मीमी पाऊस पाचोरा तालुक्यात झाला. दिनांक 23 सप्टेंबर 2025 पर्यंतचे एकूण पर्जन्याचे प्रमाण 189 टक्के आहे. यांची शासकीय नोंद उपलब्ध आहे.
तसेच भडगाव तालुक्यात दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी पर्जन्याची सरासरी 90.70 मी. मी इतकी नोंद झालेली आहे. उक्त पर्जन्याची पर्जन्यमापकानुसार शासकीय नोंद शासनाच्या एकरी उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर शासन निर्णयानुसार माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांनाही आपण मदत द्यावी ही विनंती.
अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील खरीपाची पिके पूर्णपणे नष्ट झालेले आहे, त्यासोबत शेत जमिनी वाहून गेलेल्या आहेत, विहिरी खचलेल्या असून, शेतातील पाईप लाईन, ठिबक, बांध, फळबागा इत्यादीचे पूर्णताः नष्ट झालेले असून, पक्के डांबरी रस्ते दिसेनासे झालेले आहे. पूल नष्ट होणे, बंधारे वाहून जाणे, दुध दुभती जनावरे बैल, गाय, बकरी, म्हैस, कोंबडी इत्यादी मोठ्याप्रमाणात हानी झाली आहे.
तसेच काही शेतकऱ्यांकडील मळणी यंत्रणे, शेत्तीचे अवजारे, इत्यादी नष्ट झालेले आहे. याव्यतिरिक्त पाचोरा भडगाव तालुक्यातील रहिवाशी घरांचे संपूर्ण संसार वाहून गेलेले आहे. पाचोरा व भडगाव शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. इत्यादी परिस्थितीचा सांख्ल्याने विचार करता पाचोरा भडगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वरील शासन निर्णयानुसार तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून 3 पट आर्थिक मदत द्यावी, ही विनंती. असे निवेदन देण्यात आले आहे.



