आपल खान्देश
बैलगाडी शर्यत बंदी उठल्यामुळे चांद्यापासून ते बांद्यापर्यंत अवघा महाराष्ट्र मध्ये बळीराजा जल्लोष!
नांदगाव( प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – राज्यामध्ये बैलगाडी शर्यती ची सात वर्षापासून असलेली बंदी अखेर उठवण्यात आली आहे. राज्यामध्ये आता बैलगाडी शर्यती सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल सात वर्षांनी राज्यामधील बैलगाडी शर्यती ने धुरळा उडणार आहे.
यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठा कडे जाणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई शासनाने आत्ताच जिंकले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडी मालकांनी जल्लोष साजरा केला.
सन 2017 साली कोर्टाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. आणि त्या नंतर ही बंदी उठवण्यास विधानसभे पासून ते लोकसभेपर्यंत मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी झाली. आता बंदी उठल्यामुळे चांद्यापासून ते बांद्यापर्यंत अवघा महाराष्ट्र मध्ये बळीराजा जल्लोष साजरा करतो. मात्र या जरी बैलगाडी शर्यती भरवण्यासाठी जरी न्यायालयाने परवानगी दिली. असेल तरी ती बंदी सशर्त आहे. च्या अनुषंगाने काही नियम घालून दिलेले आहेत ते नियम पुढीलप्रमाणे आहेत.
धावण्याची अंतर एक हजार मीटरपर्यंत अधिक लांबीचे नसावे, शर्यतीची धावपट्टी उतार दगड किंवा खडक चिखल दलदल असे ठिकाण असावे, शर्यत रस्त्यावर महामार्गावर आयोजित करण्यात येऊ नये, बैल वळूचा वापर एका दिवसात तीन पेक्षा अधिक शर्यतीत करू नये, धावपट्टी आणण्यापूर्वी किमान वीस मिनिटे आराम द्यावा, इतर कोणतेही वाहन धावपट्टी किंवा बैलगाडा शर्यती जवळ चालवता येणार नाही, कोणत्याही प्रकारे बैलाला दुखापत होता कामा नये, बैल वळूच्या जोड्या सुसंगत असाव्यात, शर्यतीच्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी सुविधा उपलब्ध असावी, बैलांना शर्यतीचे अगोदर कोणतेही उत्तेजक द्रव्य देऊ नये. अशी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे.




