आपल खान्देश
हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष समितीचे उजनी धरणात जलसमाधी आंदोलन
भिमानगर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्या इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी योजना मंजूर केली. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारल्याने जिल्ह्यात सध्या वेगवेगळ्या मार्गाने विरोध सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून उजनी धरणात विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे.उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन सुरु असून टेंभुर्णी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी शनिवारी पहाटे पासूनच शिराळ टे, सुरली, उजनी टे, भिमानगर या गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी देखील छुप्या मार्गाने मिळेल त्या वाटेने शेतकरी उजनी धरण जलाशयाकडे आले आहेत. शेतकरी नेते अतुल खुपसे, जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख यांना आंदोलनस्थळी पोहचू दिले नाही.




