भडगाव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने भव्य तिरंगा पदयात्रा.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भडगाव शाखेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरात भव्य दिव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
पदयात्रेची सुरुवात आदर्श महाविद्यालय भडगाव येथून झाली व संपूर्ण शहरातून शेवट समारोप श्रीराम मंदिर या ठिकाणी करण्यात आला. समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय जिल्हा संघचालक श्री. डॉ. निलेश जी पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अभाविप विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, प्रमुख उपस्थित डॉ. निळकंठ पाटील, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रा. सुरेश कोळी, शहरमंत्री आशुतोष पाटील व कार्यक्रम प्रमुख आदित्यराज पाटील उपस्थित होते. तिरंगा पदयात्रेत पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर,ए.पी.आय पालकर, स्वप्नील चव्हाण, विलास पाटील नितीन राऊत भडगावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक,पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



