आघाडी सरकारच्या नाकर्तेपाणा विरोधात ठाणे जिल्ह्यात भाजप ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन!!
Published by Dileep Jay Pardeshi @ Zoom Marathi News // 03Jun 21.Thursday
ठाणे (प्रतिनिधी ) महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्ते पणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले आहे या नाकर्त्या सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.योगेश आण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आक्रोश आंदोलन आज ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये शहापुर तहसील कार्यालय,मुरबाड येथील तहसील कार्यालय, भिवंडी येथे प्रांत कार्यालय असे संपूर्ण जिल्ह्यात 800 ते 900 कार्यकर्ते उपस्थित राहून आंदोलन यशस्वी केले. ह्यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार कपिलजी पाटील साहेब यांनी तर मुरबाड तहसील कार्यालयात आमदार किसनजी कथोरे साहेबांनी निवेदन दिले तर शहापुर येथे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदे,अशोकजी इरणक,शहापुर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव,काशिनाथ भाकरे, योगेश परदेशी,विवेक नार्वेकर,राजेश कुमार शिर्के,रंजना उघडा,प्रकाश सांडे, हरीश निचिते,योगेश ठाकरे,प्रशांत फुले,राम जागरे,शरद गोटारणे, सतीश सापळे,दीपक बोंबे, संदीप गोरले,शशांक हरड,विलास जोशी ,प्रमोद बसवंत,बाळू विदे ,आकाश अधिकारी, प्रियेश जगे,शरद तरने सर्व ओबीसी मोर्चा मंडळ अध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून आंदोलन तहसील कार्यालयात निवेदन दिले.
अशी माहिती जिल्हा सहसंघटक योगेश परदेशी यांनी दिली.



