पाचोऱ्यातील जारगावाच्या खेळाडूंनी एकादशी निमित्ताने भाविकांना केले फराळाचे वाटप..
- दिलीप जय परदेशी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने पंढरीनगरीत जमतात. तसेच महाराष्ट्रातील गावोगावी देखील विविध मंदिरांमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने भाविक पायी जात असतात त्यासाठी पाचोऱ्यातील खेडाळूनी भाविकांना प्रसाद म्हणून केळी वाटप करून समाज सेवेचे दिले दर्शन.
अडचणीच्या वेळी मदत करणे, कोणताही भेदभाव न करणे, जीवन एकदा आहे, त्यामुळे देव हा आपल्या मध्येच आहे, आपल्याला पंढरपूरला जाऊन दर्शन जरी घेता नाही आले तरी चालेल परंतु जो अडचणीत आहे, जो भुकेला आहे त्याला सहकार्य करा त्यातच विठ्ठल भेटेल आपल्याला व बोला पंढरीनाथ महाराज की जय अशा घोषणा देत, आज जारगाव येथील राधानगरी व जारगाव येथील खेळाडू मित्र मंडळी यांनी सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविकांना प्रसाद म्हणून केळी वाटप केली. ह्या कार्यक्रमादरम्यान जारगावचे सरपंच सुनीलआबा पाटील उपस्थित होते तसेच परेश पाटील (माँटी), अनिल देसाई, निवृत्ती तांदळे, सुमेध जाधव, दिपक शेजवळ, अक्षय पाटिल, संदीप पाटील, भूषण जोंधळे, समाधान निकम, निखिल पाटील, गौरव वाघ, कुणाल महाले, सुनील पाटील, विशाल निकम, हर्षल पाटील, भूषण बैसाणे, रोशन जोंधळे, दिपक अहिरे. चींधा तेली, मिथुन पाटील, सुरज पाटील, दिपक पाटील हे खेळाडू मित्र मंडळी उपस्थित होते.


