अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतर करा, पडळकरांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
झूम मराठी
राज्यातील उस्मानाबाद शहराचे धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे बदलल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची देखील मागणी पुढे आली आहे.
हिंदू राजमाता, हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे.
जय अहिल्या, जय मल्हार…@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/a3Ylvwmkex— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 27, 2022
अहमदनगरचे नाव देखील बदलून पुण्यश्लोक आहिल्यादेवी नगर करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता भाजप आमदार पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे, त्यामुळे आता शिंदे सरकार अहमदनगरचे देखील नामांतर करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.




