हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले! तापी नदीपात्रात विसर्ग सुरू..
हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले! तापी नदीपात्रात विसर्ग सुरू..
जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या मध्य प्रदेश व विदर्भातील पाणलोट क्षेत्रात जोरदार झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची पातळी २१०.६९० मीटर वाढली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजे दरम्यान एकूण २२१.६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आणि ५७.११ टक्के साठा झाला होता.
त्यामुळे धरणाचे १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. दुपारी दोननंतर सहा दरवाजे बंद करण्यात आले असून, आठ दरवाजे दीड मीटरने उघडे असून, नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासनाने केले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मध्य प्रदेशातील देडतलाई व टेक्सा, तर विदर्भात संततधार सुरू असल्याने हतनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे मंगळवारी रात्री एकला धरणाच्या १४ दरवाज्यांमधून २७१५७ क्यूसेक पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले.



