एसटीचे राज्य शासनात विलीनकरण झाल्यास जनतेचा होणारा फायदा प्रवाशी कर असलेला तो रद्द होईल टोल टॅक्स द्यावा लागणार नाही, म्हणजेच एसटीचे वर्षाला 3500 करोड रुपये वाचतील
डिझेल वरील कर जो की महाराष्ट्र सरकारचा 27% आहे तो रद्द होईल..वरील सर्व पैसा वाचला म्हणजे तिकीट दरात जवळपास 40% कपात होऊ शकते
म्हणजेच जिथे 100 रुपयाचे तिकीट आहे तिथेच 60 रुपयेच द्यावे लागनार…
त्यामुळे प्रवाशी मायबाप जनता… यां महागाईच्या काळात आपला जर एवढा पैसा वाचणार असेल तर आपणही आपल्याला जमेल त्या प्रमाणे शासन दरबारी ही गोर गरीब जनतेची हक्काची असलेली एसटी ही
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनात विलीन करण्यासाठी RMBKS- MSRTC राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ- व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शाखेच्या वतीने दि.3 नोव्हेंबर 2021 ते 9 नोव्हेंबर2021 रोजी एस.टी.कर्मच्यार्यांचे कालीफित आंदोलन तसेच दि.10नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात एक दिवशीय धरणे प्रदर्शन व राज्यसरकारला व परीवहनमंत्री व विभागाला निवेदन दिले जाणार आहे. या आंदोलनाला सर्व सामान्य जनतेने साथ सहयोग देऊन हातभार लावावा आणि आज जो काही एसटी कर्मचारी RMBKS MSRTC च्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांची लढाई लढत आहे त्यांना पाठिंबा द्या.
प्रवाशी बांधवानो आज जर आपली ही लालपरी वाचली नाही तर खेडपाड्यातील जनतेचा विविध शहराशी असलेला संपर्क तुटेल आणि आणि भविष्यात होणाऱ्या विकासपासुन सुद्धा आपण खूप लांब राहू, कारण ही एसटी म्हणजे फक्त एक साधन नाही तर महाराष्ट्रातील 11 कोटी गोर गरीब जनतेच एक हक्काच साधन आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा