आपल खान्देश

आ. कुणाल पाटील यांनी त्यांच्या मतदार संघातील क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नुकसानाची केली पाहणी

झूम मराठी धुळे (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्रात पावसाने घातलेल्या थैमानात पीक उत्पादनासोबतच गुणवत्तेलाही मोठा फटका बसला आहे. आ. कुणाल पाटील यांनी त्यांच्या मतदार संघातील क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.

अतिवृष्टीमुळे जवळपास 70 ते 80 टक्के पिके उद्‍ध्वस्त झाली आहेत तर उभी असलेली पिके सुद्धा डागाळलेली असून, कापसाचे उत्पादन आणि धाग्याची लांबीसुद्धा घटण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात पांढर सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, या अतिवृष्टीमुळे हे मुख्य पीक धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आज माझ्या मतदारसंघातील नेर, लोहगड, लोणखेडी, अकलाड, मोराने, उडाणे, गोताने, येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कापूस व इतर पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी सोबत असलेल्या धुळे

तालुका कृषी अधिकारी व्ही. आर प्रकाश, मंडळ कृषी अधिकारी पी. जे. पाटील, कृषी पर्यवेक्षक आर. व्ही. बोरसे, कृषी सहाय्यक चेतन शिंदे, कृषी सहाय्यक किरण देवरे यांच्याशी शेतातच चर्चा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्याकामी काटेकोर पंचनामे करण्याच्या व एकही बाधित शेतकरी वंचित राहू नये म्हणून दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे